Powered By Blogger

Wednesday, December 2, 2009

बिहाराष्ट्र...


Thursday, November 26, 2009

तुम मिले...

तू ही मेरी है सारी ज़मीन
चाहे कहीं से चलूं
तुझ में ही आके रुकु

तेरे सिवा मैं जाऊं कहाँ
कोई भी राह चुनु
तुझ में ही आके रुकु

तुम मिले तो लम्हें थम गये
तुम मिले तो सारे गुम गये
तुम मिले तो मुस्कुराना आ गया

तुम मिले तो जादू छा गया
तुम मिले तो जीना आ गया
तुम मिले तो मेने पाया है खुदा

तुझ में किनारा दिखे
दिल को सहारा दिखे
आ मेरी धड़कन थम ले

तेरी तरफ ही मुड़े
यह सास तुझसे जुड़े
हर पल यह तेरा नाम ले

तुम मिले तो अब क्या है कमी
तुम मिले तो दुनिया मिल गई
तुम मिले तो मिल गया असरा

तुम मिले तो जादू छा गया
तुम मिले तो जीना आ गया
तुम मिले तो मेने पाया है खुदा

दिन मेरे तुझसे चले
रातें भी तुझसे ढले
है वक़्त तेरे हाथ में

तू ही शहर है मेरा
तुझ में ही घर है मेरा
रहता है तेरे साथ में

तुम मिले तो मिल गया हम सफ़र
तुम मिले तो खुद की है खबर
तुम मिले तो रिश्ता सा बन गया


तुम मिले तो जादू छा गया
तुम मिले तो जीना आ गया
तुम मिले तो मेने पाया है खुदा

Sunday, November 8, 2009

तेव्हा तुझी आठवण येते ....

कोणत्या मधुर रात्रि जेव्हा कोनी सोबत नसते
तेव्हा तुझी आठवण येते ...
आकाशात जेव्हा एकट्या चंद्राला बघत असतो
तेव्हा तुझी आठवण येते ...
जेव्हा कोणती कविता मनात येते त्याच्या पहिला शब्द तू असते
तेव्हा तुझी आठवण येते ...
कोण्या सायंकाळी एकटे फिरत असताना मन जेव्हा उदास होते
तेव्हा तुझी आठवण येते ...

रात्रि झोपताना जेव्हा विचार करतो
तेव्हा तुझी आठवण येते ...
आरश्यात जेव्हा स्वताहाचा चेहरा बघतो तेव्हा
तेव्हा तुझी आठवण येते ...
मित्रांच्या गर्दित जेव्हा माला एकटेसे वाटते
तेव्हा तुझी आठवण येते ...
जेव्हा मी माझ्या आयुष्यातले प्रत्येक क्षण मोजतो
तेव्हा तुझी आठवण येते ...

स्वपनाताही तुझीच आठवण येते ,
जेवातानाही तुझीच आठवण येते ,
बोलतानाही तुझीच आठवण येते ,
गर्दीतही तुझीच आठवण येते ,
एक क्षण संपतो जेव्हा
तेव्हा तुझी आठवण येते ...!!

---

SuMeSh

Tuesday, November 3, 2009

तू जाने ना ...

कैसे बताए क्यूँ तुझको चाहे
यारा बता ना पाए
बातें दिलों की देखो जो बाकी आँखे तुझे समझाएँ
तू जाने ना
तू जाने ना

तू जाने ना
तू जाने ना

मिल के भी
हम ना मिले
तुमसे ना जाने क्यूँ
मीलों के है फ़ासले
तुमसे है जाने क्यूँ
अंजाने हैं सिलसिले
तुम से ना जाने क्यूँ
सपने है पलकों तले
तुम से ना जाने क्यूँ

कैसे बताए क्यूँ तुझको चाहे
यारा बता ना पाए
बातें दिलों की देखो जो बाकी आँखे तुझे समझाएँ
तू जाने ना
तू जाने ना

निगाहों में देखो मेरी जो है बस गया
वो है मिलता तुमसे हू बहू

जाने तेरी आँखें थी या
या बातें थी वजह
हुए तुम जो दिल की आरज़ू
तुम पास हो के भी
तुम आस हो के भी
एहसास हो के भी
अपने नही

ऐसे है अपने गीले
तुम से ना जाने क्यूँ

मीलों की है फ़ासले
तुमसे है जाने क्यूँ
तू जाने ना
तू जाने ना

ख़यालों में लाखों बातें
यूँ तो कह गया
बोल कुछ ना तेरे सामने
हुए ना बेगाने भी तुम
होके और के
देखो तुम ना मेरे ही बने

अफ़सोस होता है
दिल भी यह रोता है
सपने संजोता है
पगला हुआ सोचे ये
हम थे मिले
तुम से ना जाने क्यूँ

मीलों की है फ़ासले
तुमसे है जाने क्यूँ
अंजाने हैं सिलसिले
तुम से ना जाने क्यूँ
सपने है पलकों तले
तुम से ना जाने क्यूँ

कैसे बताए क्यूँ तुझको चाहे
यारा बता ना पाए
बातें दिलों की देखों ज़ुबान की आँखे तुझे समझाएँ
तू जाने ना
तू जाने ना

तू जाने ना
तू जाने ना

Monday, October 26, 2009

जीवन...

जीवनात नाती तशी अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक फार कमीच असतात......

काही नाती असतात रक्ताची,
तर काही हृदयाची......

काही नाती असतात जन्मो-जन्मीची,
तर काही.. ' काही क्षणापुरतीची '.......

काही नाती असतात,
केसांसारखी न तुटणारी,
पण वेळ आलीच तर वाकणारी.....

काही नाती असतात,
लांबुनच आपले म्हनणारी,
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....

काही नाती असतात,
पैशाने विकत घेता येणारी,
तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......

काही नाती असतात,
न जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी......

जीवनात नाती तशी अनेकच असतात....

म्हणुनच म्हणतात ना.....

" हे जीवन एक रहस्य आहे,
तिथे सर्व काही लपवावं लागतं....
मनात कितीही दुःख असले,
तरी जगा समोर हसावं लागतं...."

आठवणी...

बालपणीच्या पावसातील आठवणी
आठवतात अजुनही मला ते पावसाळ्यातील दिवस
शाळेत जायचा देखील जेव्हा यायचा मला आळस

आठवतो पावसासोबत येणारा तो गार गार वारा
नी मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा
वाऱ्यावर झुलणारी ती हिरवीगार झाडं
नी पावसात बागडणारी ती माझ्यासारखी वेडी मुलं

आठवते मला अजुन ती हौस चिंब भिजण्याची
पावसात जाऊन मनसोक्त गाणी म्हणण्याची
यत्किंचितही नसलेली ती आजाराची पर्वा
आईचा मात्र काळजीने जीव व्हायचा हळवा

आठवतात पाण्यात सोडलेल्या त्या इवल्याश्या होड्या
एकमेकांवर पाणी उडवुन इतरांच्या काढलेल्या खोड्या
ते स्वच्छ धुतलेले कपडे खराब व्हायचे चिखलात
पण आईच्या कष्टाचे विचारही नसायचे मनात

आठवतात मला त्यानंतर कडाडणाऱ्या विजा
नी मग घराकडे पळतांना धडपडुन झालेल्या ईजा
घरात गेल्यावरही ठरलेलं होतं बाबांचं ओरडणं
आईचे मात्र शांतपणे केस कोरडे करणं

आठवतात आईच्या हातचे ते गरमागरम पोहे
नी सर्दी साठी जबरदस्ती घेतलेले ते कडूशार काढे
सरते शेवटी आठवते ते उघडणारे आभाळ
डोळ्यांसमोरुन तरळून जायची मस्तीत घालवलेली संध्याकाळ

अजुनही आठवते मला पावसातील लहानपणीची धमाल
नी आठवताना मग आसवांनी भिजून जातो रुमाल

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....


परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात


भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं.

Saturday, October 24, 2009

माझी lovestory..........

खुप आधीची गोष्ट आहे
तू माझ्या क्लास मध्ये होतीस
नाव गाव पत्ता माहित नव्हतं
पण दिसायला मात्र सुन्दर होतीस

love at first sight वर माझा विश्वास नाही
पण मी तुला किती वेळा पहायचो हे मीही कधी मोजलं नाही
हळू हळू क्लास मध्ये माझी attendance वाढू लागली
नजर माझी फल्यावर कमी आणि तुझ्यावर जास्त
खिळू लागली

काय करू शकत होतो मी ..तुझ्या नावाच्या चार कविता लिहिण्या शिवाय
तुला समजावणारं कोणीही नव्हत माझ्या ह्या डोळ्यांशिवाय
डोळ्यांची भाषा तुला कधी
कळलीच नाही
तू माझी कधीच ...कधीच होवू शकली नाहीस

कुठलाही पाउस मला नंतर भिजवू शकला नाही
की कुठलेही वादळ माझे अश्रु सुकवु शकले नाही
कसा जगलो आहे मलाच माहिती आहे
एक एक क्षण तुझ्या
आठवणीने छ्ळले आहे

क्षण पुढे जातात ...पण मन कुठेतरी मागेच राहिलेले असतं
काहीतरी ...काहीतरी बदलण्याचा प्रयत्न करत असतं
माझही मन अजुन त्याच क्लासमध्ये आहे
अजुनही तुझ्या त्या गोड चेहऱ्याकड़े बघत आहे

प्रेम करत होतो मी तुझ्यावर आणि करतच राहीन
हसले जरी ओठ माझे तरी मन नेहमीच रडत राहिल
असतील आकाशात सूर्य चन्द्र आणि अनंत तारे............
तरी माझ्यासाठी हे
आभाळ नेहमीसाठी काळेच राहिल

स्वप्न माझं संपलं तरीही
मनात तूच उरणार आहे
तुझ्यात मी नसले तरी
माझ्यात तूच सापडणार आहे !

Wednesday, October 14, 2009

My first English poem...

why do i miss u?

why am i the same?
why do i miss u?
why do i feel the same for u?

still waiting 4 u..
still feeling the same..
at the same place where u left me...
not complete without u...
want u in my life...

i see u
in evry person whom i met..
in every flower i smell...
in every moment i spent...
in every song i listen...
in every painting i imagine...

what should i do?
how should i get diverted?
even if i don't want to...
how should i get engaged?
even if i don't want to....

still the same questions...
why do i love u?
why do i miss u?
why do i care for u?

please come back...
how should i tell u...
i want u..
i need u...
please come back...

...Abhijeet...

Sunday, October 4, 2009

वेड मात्र तुझे आहे....

झोप माझी असली तरी
स्वप्न मात्र तुझे आहे
रंग माझे असले तरी
चित्र मात्र तुझे आहे

ह्रदय माझे असले तरी
ध्यास मात्र तुझा आहे
नजर माझी असली तरी
भास मात्र तुझा आहे

शब्द माझे असले तरी
वर्णन मात्र तुझे आहे
वेडा मी असलो तरी
वेड मात्र तुझे आहे

आयुष्य माझे असले तरी
त्यावर हक्क फक्त तुझा आहे
पूर्ण नसलो जरी मी
अपुर्ण मात्र तुझ्या मुळेच आहे

Saturday, October 3, 2009

मी तुला कधी न पड्णार स्वप्न आहे...

मी तुला कधी न पड्णार स्वप्न आहे
मी कधीही न उलगड्णार तुझ गुपीत आहे!

मी वास्तवतेतही जरी......
मी तुझ्यासाठी न सुट्णार एक कोड आहे!
मी येइन तुला भेटायला........
अचानक नकळ्त.......
एकान्तात असशील न तू?????????
तेव्हाच येईन भेटायला....

मी येईन पहाटेचा गार-गारवा बनुन
अचानक नकळ्त........
स्पर्शुन जाईन तुला
तुझ्या नकळ्त.............
मी येइन.....भर उन्हात
तू चालत असशील न?
भररस्त्यातुन .....झपाझपा
मी येइन तुझी सावली बनुन
मी येईन सान्झवेळी........
मन्द मन्द सुवास बनुन....
तुझ्याच दारी.....तुळ्शीव्रन्दावनापाशी
मी येईन .......तुझ्या खिड्कीतुन डोकावीन
आकशातला चान्दवा बनुन
तुला डोळेभरुन पाहीन.......

मी ??? मी येईन
तुझ्यासाठीच येईन
मी आता मात्र येईन तुला न पड्णार स्वप्न बनुन
कारण मी तुझ गोड गुपीत आहे .. .....
न सुट्णार कोड आहे!

Tuesday, September 22, 2009

फक्त तुला भेटण्यासाठी!!!!!!



मी सुदधा खिडकिच्या गजातुन पाउस बघत असतो
"कशी आहे ती सांग ना रे"अस सारख त्याला विचारत असतो.....

तुझ्या सोबत धुन्द भिजलेल्या छळतात त्या सार्‍या आठवणी
तु नाहिस आता सोबत हि जाणीव व्यापुन उरते मनी......

पहिल्याच भेटीचा दिवस डोळ्यासमोर उभा राहतो
चेहरा तुझा मग तासन तास विचारत तरळ्तो.....

वास्तवाच कडेलोटाच भान आल कि खुप त्रास होतो
पण तरीही हे सगळ मी निमुटपणे सहन करतो.....

कारण त्याच्या सोबत तु ही बरसत आहेस अस समजुन
मी नेहमीच मनोमनी ह्या पावसात भिजत असतो.....

फक्त तुला भेटण्यासाठी!!!!!!



Nice Article about Love- by Swami Vivekananda...

I once had a friend who grew to be very close to me. Once when

we were sitting at the edge of a swimming pool, she filled the

palm of her hand with some water and held it before me, and said

this:



"You see this water carefully contained on my hand? It

symbolizes Love."



This was how I saw it: As long as you keep your hand caringly

open and allow it to remain there, it will always be there.

However, if you attempt to close your fingers round it and try

to posses it, it will spill through the first cracks it finds.



This is the greatest mistake that people do when they meet

love...they try to posses it, they demand, they expect... and

just like the water spilling out of your hand, love will

retrieve from you .



For love is meant to be free, you cannot change its nature. If

there are people you love, allow them to be free beings.



Give and don't expect.

Advise, but don't order.

Ask, but never demand.



It might sound simple, but it is a lesson that may take a

lifetime to truly practice. It is the secret to true love. To

truly practice it, you must sincerely feel no expectations from

those who you love, and yet an unconditional caring."



Passing thought...



Life is not measured by the number of breaths we take; but by

the moments that take our breath away.....



"God does not give what we desire, but

God certainly gives what we deserve."

Friday, September 18, 2009

कवितेची कविता...

आयुष्याच्या एका वळणावर प्रत्येकजण कवी बनतो...
कधी ना कधी एक तरी कविता करतो
कधी प्रेमात तर कधी विरहात...
एकदा तरी भावुक बनतो
जगाला विसरून स्वताच्या विचारात रमतो
आपल्या भावना कागदावर उतरवतो...
नसतात कोणी सखे सोबती
तेव्हा लेखनीला जवळ करतो,शब्दांना आपल म्हणतो
आयुष्यात माणूस एकतरी कविता करतो
प्रत्येक 'स्वप्नवेडा' एकदा तरी 'शब्दवेडा' बनतो

हे प्रेम म्हणजे नक्की काय असत...

कुणी तरी सांगाल का हे प्रेम म्हणजे नक्की काय असत...
कशाला म्हणतात प्रेम...

कोणाचीतरी सतत आठवण येण हे प्रेम असत...
दिवसरात्र त्याचा विचार करण हे प्रेम असत..
येणार नाही माहित असुनही त्याच्या फ़ोनची वाट पाहन हे प्रेम असत...
की तो नाही म्हणुन गर्दीतही एकाकी वाटन हे प्रेम असत....

ऑरकुट वर सारख त्याच्या प्रोफाइल ला visit करण...
त्याचा no डायल करून रिंग वाजन्याआधी फोन कट करण याला प्रेम म्हणतात
मी बोलणारच नाही त्याच्याशी ठरवूनही ...
फ़ोन नाही तर नाही...पण atleast एक मिस कॉल ची अपेक्षा करण याला प्रेम म्हणतात
की त्याला गरज नाही तर मी तरी का भाव देऊ अस म्हणुनही
त्याच्या एका सॉरी ने क्षणात विरघलुन जाण याला प्रेम म्हणतात

त्याच्या एक नजरेसाठी व्याकुळ होण याला प्रेम म्हणतात...
त्याच्या मिठीसाठी आतुरण याला प्रेम म्हणतात...
त्याच्यासाठी वाटनार्या काळजिला प्रेम म्हणतात की
की त्या ख़ास मैत्रीला प्रेम म्हणतात...

त्याच्या जगात आपल स्थान नाही माहित असुनही
त्याच्या बरोबर स्वप्न रंगवन याला प्रेम म्हणतात...
स्वताच्याही नकळत त्याच्यात गुंतत जाण याला प्रेम म्हणतात की
तो सोडून गेल्यावरही चातकासारखी त्याची वाट पाहन याला प्रेम म्हणतात...

Do I Luv Him OR Not?

Do I Luv Him OR Not?
हाच संभ्रम आहे ना तुझ्या मनात?
मी सांगतो, याच उत्तर...
तुझ्या डोळ्यात वाचले काल, एका क्षणात...

U don't luv me...
आश्चर्य वाटले ऐकून...?
नको अशी रागावूस ग..
मी तुटून गेलोय,हे उमजुन..

नको खेलूस अशी...
तुझ्याच भावनांशी,
एकांतात उलगडेल कोड
आत्म्याच आत्म्याशी

प्रेम म्हणजे कालजी
प्रेम म्हणजे जाणीव
यापैकी माझ्याबद्दल तुला
वाटली फ़क्त उणीव...

मी करतो प्रेम तुझ्यावर
असाच करत राहीन
'कुठवर चालेन हा रास्ता?'
हे उत्तर मात्र टाळत राहीन...

'अंतापर्यंत' या उत्तराला
पर्यायी शब्द नकोय मला
तुला वेदना होतील म्हणुन
आवर घातलाय स्वताला

तू ही कधी विचारू नकोस
"का प्रेम करतो तुझ्यावर?"
माझच मला कळत नाही
'का करतो मी तुझ्यावर...?'

तू कितीही दूर गेलीस तरी
नेहमीच जवळ असतेस
मी एकांतात असताना
उगाच मला छेडतेस...

याचा दोष कधीही
मी तुला देणार नाही
तुझ्या प्रेमच अर्घ्य
जबरदस्ती पदरात घेणार नाही

माझ्या प्रेमाने माझ्यावर
बेधुंद प्रेम कराव...
पण ते प्रेम आधी
तुला स्वताला उमगाव...

नाही करत तू प्रेम माझ्यावर
माझ काहीच म्हणण नाही
मी केल म्हणुन तू ही कर
अशी काही जबरदस्ती नाही

मला सवय आहे
तुझी वाट पाहण्याची
तुझ्या प्रत्येक गोष्टीत
स्वताला झोकून देण्याची

नाही जमणार तुला
प्रेमाच्या वाटेवर चालण
हसता-हसता अचानक
डोळ्यात अश्रु लपवण...

तुझ्या एका शब्दावरून
भावना तुझी जाणतो
कस म्हणू? सांग मला
तुझ्या मनी 'मी'च रांगतो...

खोटा शब्द, खोटे आश्वासन
उगाच देऊ नकोस मला
"नाही करत मी प्रेम तुझ्यावर"
एकदाच फ़क्त सांग मला

शेवटचा का असेना
पण सोसेन हा घाव
जाइन मी दूर असाच
शोधशील का कधी माझा ठाव?

सांग ना...

Friday, August 28, 2009

|| जय भवानी! जय शिवाजी! ||

इंद्र जीमी जंभ पर
वाघवसु अंभ पर
रावणस दंभ पर
रघुकुलराज है॥

पौन पारी बाह पर
संभु रति नाह पर
ज्यो साहस बाह पर
राम द्विजराज है!!!...

उदयात माउली,
रयतेस साउली,
गडकोट राउली,
शिवशंकर हा॥

मुक्ति ची मंत्रणा,
युक्ति ची यंत्रणा,
खळदुष्ट दूर्जना
प्रलयंकर हा

संतांस रक्षितो,
शत्रु नीखंडतो,
भावंड भावना संस्थापीतो॥

ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा,
माता पिता सखा शिवभुप तो!!!

दावा द्रुमदंड पर
चीता म्रुग झुंड पर
वृषण वीतुंड पर
जैसे मृगराज है!!!...

तेज तम अंस पर
कंढ जिमी कंस पर
त्योमलीचबंस पर
सेर सीवराज हैं!!!॥

|| जय भवानी! जय शिवाजी! ||
|| जय भवानी! जय शिवाजी! ||

राजा शिव छत्रपती...


...राजा शिव छत्रपती...


राजमुद्रा


Thursday, August 27, 2009

आज दिन चढेया...

आज दिन चढेया

तेरे रंग वर्गा

फूल सा है खिला

आज दिन रब्बा मेरे दिन भी न ढले

वोह जो मुझे खवाब में मिले

उसे तू लगादे अब गले

तेनु दिल दा वास्ता

रब्बा आया दर दे यार के

सारा जहाँ छोड़ छाड़ के

मेरे सपने सवार दे

तेन्नु दिल दा वास्ता

आज दिन चढेया

तेरे रंग वर्गा


बख्शा गुनाहों को सुन के दुवो को

रब्बा प्यार है तुने सब को ही दे दिया

मेरी भी आहों को सुन ले दुवो को

मुझको वोह दिला मैंने जिसको है दिल दिया

आस वो प्यास वो

उसके दे इतना बता

वोह जो मुझको देख के हसे

पाना चहुँ रात दिन जिसे

रब्बा मेरे नाम कर उसे

तेनु दिल दा वास्ता

आज दिन चढेया

तेरे रंग वर्गा


माँगा जो मेरा है जाता क्या तेरा है

मैंने कौन सी तुझसे जन्नत मांग ली

कैसा खुदा है तू बस नाम का है तू

रब्बा जो तेरी इतनी सी भी न चली

चाहिए जो मुझे

कर दे तू मुझको अता

जीती रहे सल्तनत तेरी

जीती रहे आशिकी मेरी

देदे मुझे ज़िन्दगी मेरी

तेनु दिल दा वास्ता

रब्बा मेरे दिन भी न ढले

वोह जो मुझे खवाब में मिले

उसे तू लगादे अब गले

तेनु दिल दा वास्ता

रब्बा आया दर दे यार के

सारा जहाँ छोड़ छाड़ के

मेरे सपने सवार दे

तेन्नु दिल दा वास्ता

आज दिन चढेया

तेरे रंग वर्गा

ये दूरियां....

यह दूरियां
यह दूरियाँ
यह दूरियां

इन राहों की दूरियां
निगाहों की दूरियां
हम राहों की दूरियां
फनाह हो सभी दूरियां

क्यूँ कोई पास है
दूर है क्यूँ कोई
जाने न कोई यहाँ पे
आ रहा पास या
दूर मै जा रहा
जणू न मै हूँ कहाँ पे

यह दूरियां
इन राहों की दूरियां
निगाहों की दूरियां
हम राहों की दूरियां
फनाह हो सभी दूरियां
यह दूरियां
यह दूरियां

कभी हुआ यह भी
खाली राहों पे भी
तू था मेरे साथ
कभी तुझे मिलके
लौटा मेरा दिल यह
खाली खाली हाथ
यह भी हुआ कभी
जैसे हुआ अभी
तुझको सभी में पा ली
तेरा मुझे कर जाती है दूरियां
सताती हैं दूरियां
तरसती हैं दूरियां
फनाह हो सभी दूरियां

कहा भी न मैंने
नही जीना मैंने
तू जो न मिला
तुझे भूले से भी न
बोला न मैंने चांहू फासला
बस फासला रहे
बन के कसक जो कहें
हो और चाहत यह और जवान
तेरी मेरी मिट जानी है दूरियां
बेगानी है दूरियां
हट जनि दूरियां
फनाह हो सभी दूरियां

क्यूँ कोई पास है
दूर है क्यूँ कोई
जाने न कोई यहाँ पे
आ रहा पास या
दूर मै जा रहा
जणू न मै हूँ कहाँ पे

यह दूरियां
इन राहों की दूरियां
निगाहों की दूरियां
हम राहों की दूरियां
फनाह हो सभी दूरियां

Monday, August 24, 2009

जिंदगी के सफर में

जिंदगी के सफर में गुज़र जाते हैं जो मकाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते

फूल खिलते हैं, लोग मिलते हैं
फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर
पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं
वो बहारों के आने से खिलते नहीं
कुछ लोग इक रोज़ जो बिछड़ जाते हैं
वो हजारों के आने से मिलते नहीं
उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते
जिंदगी के सफर में...

आँख धोखा है, क्या भरोसा है
आँख धोखा है, क्या भरोसा है सुनो
दोस्तों शक दोस्ती का दुश्मन है
अपने दिल में इसे घर बनने न दो
कल तड़पना पड़े याद में जिनकी
रोक लो रूठ कर उनको जाने न दो
बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते
जिंदगी के सफर में...

सुबह आती है, शाम जाती है
सुबह आती है, शाम जाती है यूँही
वक़्त चलता ही रहता है रुकता नहीं
एक पल में ये आगे निकल जाता है
आदमी ठीक से देख पाटा नहीं
और पर्दे पे मंज़र बदल जाता है
एक बार चले जाते हैं जो दिन-रात सुबह-ओ-शाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते
जिंदगी के सफर में॥


Thursday, August 6, 2009

मी...

मी जन्माला आलो
मी रांगायला लागलो
मी बोलायला शिकलो
मी चालायला लागलो
मी... वगैरे, वगैरे, वगैरे

मी शाळेत गेलो
मी वाचायला शिकलो
मी लिहायला शिकलो
मी परिक्षा लिहिलो
मी इयत्ता ओलांडलो
मी... वगैरे, वगैरे, वगैरे

मी प्रेमात ! पडलो
मी तिच्यासाठी रडलो
मी ओठांवरची लव कुरवाळलो
मी कॉलेजात गेलो
मी पिक्चर बघितलो
मी... वगैरे, वगैरे, वगैरे

मी डोळे उघडले
मी अर्थ वाचले
मी प्रश्न लिहिले
मी शब्द गिळले
मी... वगैरे, वगैरे, वगैरे

मी अजून जगतोय
मी अजून शिकतोय
मी अजून शोधतोय
मी अजून कळतोय
मी... वगैरे, वगैरे, वगैरे

मी आत्मकेंद्री
मी आत्ममग्न
मी एककल्ली
मी स्वार्थी
मी जगन्मित्र
मी संवेदनशील
मी शिखंडी
मी खेळकर
मी अलवार
मी... वगैरे, वगैरे, वगैरे

मी एके
मी दुणे
मी त्रिक
मी चोक
मी... वगैरे, वगैरे, वगैरे

मी एक शून्य...
मी सहज मिसळतो
सभोवतालास न बदलता
मी अवचित निसटतो
कोणासही न कळता
मी इच्छा बाळगतो
कुणासही न गुणण्याची
मी कुणासच भागनेच तसेच अर्थहीनच आहेच
मी प्रयत्न करतोय
मला अर्थ देणारा
डाविकडचा अंक मिळवण्याचा

मी ऊजेडाला सोडल्यावर
माझे काळोखाशीही वाजल्यावर
मीच मला कंटाळून विचारले...
का? कधी? कशासाठी? कोणासाठी?
त्यावर सापडलेले ऊत्तर असे...

कारण..."मी एक माणूस आहे
एका मार्काचा वस्तुनिष्ठ प्रश्न नाही"

माझी ही एक मैत्रीण होती...

माझी ही एक मैत्रीण होती,
खुप शांत अन अल्लड स्वभावाची,
कधीतरी यायची लहर तेव्हा ती,
लाजून गालातल्या गालात हसायची..

मधाच्या पोकळीतून बोल ऐकू यावे,
असं ती सुमधूर आवाजात बोलायची,
बोलता बोलता मग का कुणास ठाऊक,
ती अचानक गप्प होऊन जायची..

बागेतली फुले तीला आवडायच्याआधी,
ती त्या फुलांना आवडायची,
फुलेही तीची सवड बघून तिच्यासोबत,
आनंदाने बागडायची…

तिच्यासोबत चालता चालता,
वाटही कमी पडत असे,
तिच्या सहप्रवासात नेहमीच,
वाट पावलांनाच संपताना दिसे…

अशी काहीशी ती मला खुप आवडायची,
रोज रोज मला दिवसाच्या स्वप्नातही दिसायची,
तिला विचारण्याची हिम्मत माझ्यात नव्हती,
पण तरीही माझ्या मनास तिचीच आस असायची..

एकदा असचं तळ्याकाठी बसून,
तिचं प्रतिबिंब तळ्यात पाहत होतो,
विस्कटू नये म्हणून तरंगाना,
शांत रहा म्हणून सांगत होतो…
तेवढ्यात तिने मला विचारलं,
आज काय झालं आहे तूला?
मी उत्तरलो माहित नाही
पणमला काहितरी सांगायचे आहे तूला..

तुझी दृष्टी होऊन मला,
तुझं व्हायचं आहे,
तेवढ्यात ती उत्तरली,
मला दृष्टी नसेल तरी चालेल,
पण तुला एकदा माझ्या मिठीत,
माझ्या ह्या आंधळ्या डोळ्यानी पहायचं आहे..

Saturday, June 27, 2009

Bin tere kya hai jeena....


bin tere kya hai jeena
mere dil ki raani tum
meri khushiyon ka mausam
mere khwaabon ki taaviz
mere sapanon ki tasveer
bin tere kaisi aas
woh jeet ho ya haar
tere sang hai sab kuchh
tu na ho toh bekaar
bin tere kya hai jeena....

suni khaali raaten
ruthi feeki baaten
har aahat pe chaaukun
tujhko harsu dekhu
tujhko hardam sochu
tujhko har pal chahu
tere bin toh jeevan
mera hai intezaar
bin tere kya hai jeena...

tere saath jiye jo pal
kuchh unse nahi badhkar
tere khaatir saans main loon
teri khaatir jeeta hoon
marne ki tamanna bhi
tere saath main rakhta hoon
tu hai jeene ki wajah
kar mera aitbaar
bin tere kya hai jeena...


Friday, June 12, 2009

म्हणून त्या कविता मी परत वाचत नाही...!


निजण्याआधी तुज्यावर कविता करायच्या
हे तर आता रोजचंच झालंय
आणि याची कितीही सवय झाली आहे असं म्हटलं
तरी प्रत्येक वेळेस लिहिताना मला भरून आलंय

मी कविता का लिहितो
हे मला खरंच कळत नाही
कारण जिच्यासाठी मी त्या लिहितो
तिच्यापर्यंत त्या कधीच पोहोचत नाही
आणि मनाची परत घालमेल नको
म्हणून मी ही त्या परत वाचत नाही

तुला खरं वाटणार नाही
पण माझ्या कवितेचा प्रत्येक शब्द माझं काळीज जाळतो
तू माझ्या शब्दाकडे नीट पाहिलंस
तर तुलाही कळेल की
माझा प्रत्येक शब्द मूक अश्रू ढाळतो

माझ्या या कविता
मला कधीही न सुटलेलं कोडं आहे
अफाट दुखः दाबलय मनात
कवितेतून बाहेर आलेलं हे फक्त थोडं आहे

आज वाटलं की अश्रूंच्या शाईनेच कविता लिहावी
तसेही डोळ्यातून ते आज काल आटता-आटत नाही
हे ऐकून अश्रूही आज बोलले
म्हणाले, मनात घुसमट होते म्हणून बाहेर येतो
तर आता तुला तेही पटत नाही

---
Deepak Ingle

नशीब...


तिचं माझ्या शेजारी
रोज बेंचवर बसणं
मोहून टाकायचं मला
तिची सोबत असणं

भूरभुरणारे केस त्यात
दोन गुलाबाच्या पाकळ्या
अलगद खुलल्या की
पडती गालावर खळ्या

नकळत होणारा स्पर्श
तिचा हवाहवासा वाटे
एक कटाक्ष टाकता तिने
मनात वादळ उठे

दोन वर्षे लोटली तरी
हिम्मत नाही झाली
उगाच मैत्रीत दुरावा
अशी मनात भिती आली

शेवटच्या वर्षाची
कोलेजची शेवटची भेट
ठरवलं पक्कं आज
तिला विचारेन थेट

ती आली समोरुन
शेजारी बेंच्वर बसली
टाकत एक कटाक्ष
हळूच गालात हसली

हातातलं ग्रिटिंग देत
म्हणाली हे तुझ्यासाठी
किती रे बावळट तू
वाच हे आत्ता माझ्यासाठी

प्रत्येकवेळी वर्तुळ काढताना
तुझ्या विचारांत असंच होतं
काढता काढता वर्तुळ
ते हृदयाचाच आकार घेतं

आनंदाला नव्हतं मोल
कानी फ़क्त तिचेच बोल
विश्वास खोटा ठरला नाही
मी माझाच उरलो नाही

हिवाळे पावसाळे मग
धुंद वाटू लागले
माथेरान माळशेज माथी
प्रितिचे ढग दाटू लागले

अन एक दिवस अचानक
संकट होतं लोटलं
राहतं घर सोडून त्यांनी
दुसरं शहर होतं गाठलं

खूप प्रयत्न केला
म्हटलं तिला एकदा भेटावं
काय झालं अचानक
याचं कारण शोधावं

तेंव्हा ती म्हणाली
बाबांनी लग्न ठरवलं
खूप प्रयत्न करुनही
मी तुझं अस्तित्व हरवलं

बाबांच्या प्रेमापोटी
शेवटी माझा नाईलाज
पुन्हा नाही भेटायची मी
ही शेवटची भेट आज

तिथेच सारं संपलं
क्षणात सारं कोलमडलं
पुन्हा तसाच असहाय्य
वतुळाचं गणितच नाही उलगडलं

तिचं लग्न झालं
अन दीड वर्ष उलटलं
तिचीच आठवण काढत
माझं शरीर खालावलं

नियतीने मांडला खेळ
बघा कशी आली वेळ
पुन्हा शेजारीच ती येउन बसली
नजर चुकवत किंचितशी हसली

विस्कटलेले केस त्यात
सुकलेल्या पाकळ्या
खुलणार नाहीत आत्ता
बुजुन गेल्या खळ्या

मी तसाच निशब्द
हे असं कसं झालं
माझं गुलाबाचं फ़ुल
कसं वाळून गेलं

बाबांच्या प्रेमापोटी
लग्नानं झाली बेजार
नाही मिळालं सुख
जडला मरणाचा आजार

तिने यातना भोगल्या
असहय्य वेदना सोसल्या
येवुदे आत्ता सुखी मरण
या इच्छेने रात्री जागल्या

अन ती होती शेजारीच
बेड नं १०७
एकटीच विवळत पडलेली
मरणाशी करत दोन हात

आजही तिचा स्पर्श
हवावासा वाटणारा
सहवास तिचा जणू
स्वर्गाचा रस्ता गाठणारा

हळूच तिचा हात धरता
थोडी ती सुखावली
तसाच रे बावळट अजून
म्हणत ती रागावली

म्हणाली मी तुला दुखवलं
तुझी मी अपराधी
म्हणूनच आत्ता मरण
अशी ही असहय्य समाधी

अगं देवाचे आभार मान
की त्याला शेवटी कळलं
कितीही झालं तरीही
आपलं प्रेमाचं नातं जुळलं

बस्स…..आत्ता काही नको
असचं हात धरुन डोळे मिटू
ईथे नाही झालं पूर्ण स्वप्न
चल……तडक स्वर्ग गाठू….


……..अमरीश अ. भिलारे.

Wednesday, June 10, 2009

O Ajnabee...


O Ajnabee Mere Ajnabee

Na Jaane Tum Kahan Chale Gaye Ho

Yaad Mujhe Tum Kitna Aa Rahe Ho

Suni Si Hai Dil Ki Gali

O Ajnabee Mere Ajnabee


Tere Pyaar Ki Nishaniya

Ban Gayi Kahaniya

Phir Se Mohabbat Phir Kaise Main Pyaar Karoon

Phir Se Wafa Ka Kaise Mein Ikraar Karoon

Tere Pyaar Mein Main To Dhali

O Ajnabee Mere Ajnabee


Kis Se Kahoon Pareshaaniya

Dil Pe Kar Ja Meherbaaniya

Pal Jo Beete To Lambi Judaai Huvi

Ek Ek Pal Mein To Parai Hui

Aakar Mujhe Le Ja Abhi

O Ajnabee Mere Ajnabee

O Ajnabee Mere Ajnabee


Kasam Ki Kasam...


Kasam ki kasam hai kasam se
Humko pyaar hai sirf tumse........
Ab yeh pyaar na hoga phir humse

Log kehte hain paagal hoon main yeh bhi na jaanoon
Dil lutaaya hai maine, ab kisi ki na maanoon
Chain de karke maine bechainiyaan yeh li hai
Neendein udaake maine tumse vafaayein ki hai

Kasam ki kasam hai kasam se
Jee rahe hain hum tere dam se
Ab yeh pyaar na hoga phir humse
Kasam ki kasam hai kasam se
Humko pyaar hai sirf tumse

Kuch ishaaron mein tumne humse jo yeh kaha hai
Ab yakeen aa raha hai, tumko bhi kuch hua hai
Kyoon tumko dekhte hain, kya dil mein sochte hai
Toofaan jo uth raha hai, hum usko rokte hain
Kasam ki kasam hai kasam se
Yeh milan hai sanam ka sanam se
Ab yeh pyaar na hoga phir humse

Kasam Ki kasam

Haan kasam

Yeh kasam

Di kasam

Li kasam

Haan kasam

Kasam Kasam Kasam

Kasam ki kasam hai kasam se
Humko pyaar hai sirf tumse
Ab yeh pyaar na hoga phir humse...


Sunday, June 7, 2009

उत्तम प्रवासी...



काही माणसे असतात खास...


काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात....

Tuesday, May 26, 2009

मी.........


खंरतर स्वताबद्दल काय लिहायचे असा प्रश्न सर्वानांच पडतो कदाचित! 
कारण मला तो पडला होता. 
Internet च्या अभासी दुनियेत म्हणजे येथे मि काहीही लिहले ते खरे का खोटे हे त्या समोरच्या व्यक्तीच्या विश्वासावरचं अवलंबुन असेल...........
समोर बसलेली व्यक्ती खरी का खोटी हे जस तुम्हाला त्याच्याशी मैत्री केल्याशिवाय समझणार नाही. 
तसं ते मलाही सांगता येणार नाही.

प्रत्येकाचे स्वभाव, आवडी-निवडी, जरी वेगळे असले तरी मैत्री होण्याचे बरेच Chance आहेत. 
एकाद्याचे मन जिंकल्याशिवाय जशी निखळ मैत्री होत नाही तशी तेच मन दुखवल्यावर ति मैत्री टिकतही नाही.

तरीही मला तुमच्याशी मॆत्रि करण्यात Intrest आहे. 
कारण आयुष्याचा प्रवास तुम्हा-आम्हाला एकदाच करायचा आहे..........
एकचं संधी आयुष्य जगण्याची, मित्र होण्याची..........
आयुष्याच्या प्रवासात मैत्रीच्या ट्रेनमध्ये प्रवास करण्याची.............. 
करालं ना मग मैत्री?...


"असाच आहे मी
चांदण्यांबरोबर रात्री गप्पा मारणारा
वाऱ्याबरोबर दुर
फिरायला जाणारा
हिरव्या सावलीत
कोठेतरी रमलेला
असाच आहे मी
कवितेतल्या चारओळीत
कोठेतरी हरवलेला"


मी आहे हा असा आहे,पटले तर बघा नाहीतर सोडून द्या.

धन्यवाद!!!!!!!!!!!!!!!


माज़्या सारखा एखादाच असतो
नशीबवान तर सगळेच असतात
नशीबाला बदलणारा एखादाच असतो
हसतमुख तर सगळेच असतात
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो
मर्त्य तर सगळेच असतात
कर्तुत्ववान अमर एखादाच असतो
चमकणारे काजवे बरेच असतात
प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो
सुखाचे सोबती सर्वच असतात
दुःखाचा साथीदार एखादाच असतो
अनुभवाने शहाणे बरेच असतात
अनुभवालाही शाहाणा करणारा एखादाच असतो
जाळणारे बरेच असतात
मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो
प्रेम करणारे बरेच असतात
पणं माज़्या सारखा प्रेम करणारा एखादाच असतो.............




आयुष्याला "fullstop"लागायच्या आधी......
काहीतरी करून दाखवायचय,
लाखोंच्या गर्दीत स्वतःसाठी
"red carpet"बनवायचय !!
आरशासमोर उभं राहून
नजर वर करून 'त्याला' बघायचय,
ताठ मानेनेच 'त्या' समोरच्याला विचारायचय,
तू फ़क्त बोल,अजून कोणतं क्षितिज गाठायचय!!!
सरवांच्या मनात एक छोटंस
घर करून राहायचय,
माझ्या नुसत्या आठवणींतुनच
दुःखी मनांना हसवायचय,
एकदा का "fullstop" लागला की,
आठवणींतुनच मला पुन्हा जगायचय!!!!

Friday, May 15, 2009

पाऊस असा रुणझूणता

पाऊस असा रुणझूणता

पैंजणे सखीची स्मरली

पाऊस भिजत जाताना

चाहूल विरत गेलेली ...

ओले त्याने दरवळले

अस्वस्थ फुलांचे घोस

ओलांडून आला गंध ,

निस्तब्ध मनाची वेस

पाऊस असा रुणझूणता

[ पाउस सोहला झाला ,

पाउस सोहला झाला कोसळत्या आठवणीचा

कधी उधाणता अन केव्हा

संथ थेम्बंच्या संथ लयीचा ]..

नभ नको नको म्हणताना पाउस कशाने आला

गात्रातून स्वच्छंदी अन अंतरात घुसमटलेला..

पाऊस असा रुणझूणता पैंजणे सखीची स्मरली

पाऊस भिजत जाताना चाहूल विरत गेलेली..

लागते अनाम ओढ श्वासाना

लागते अनाम ओढ श्वासाना

येत असे उगाच ओठाना

होई का असे तुलाच स्मरताना.....

एकांती वाजतात पैजणे

भासांची हालतात कंकणे

कासावीस आसपास बघताना.....

मी असा जरी निजेस पारखा

रात्रीला टाळतोच सारखा

स्वप्न जागती उगाच निजताना.....

आज काल माझाही नसतो मी

सर्वातुन एकटाच असतो मी

एकटेच दूर दूर फ़िरताना.....

.... " वेडू..."

आठवण कुणाची येते ना...
तेव्हा मन वेडं होत...
पापणीच्या आडून मग...
अलगद ते ओघळू लागतं

तुला ही आठवण येईलच ना...
तेव्हा डोळे येतील भरून,
थरथरणार्या ओठांवर...
शब्द ही जातील विरून
मोत्यासार्ख्या अश्रुंना
ओंजळीत घ्यावं लागत

बघ ना...बोलत बोलता॥
मन होइल तुझं हलकं...
मी ही मग स्वतःला
मुक्यानेच करेन बोलकं...

मग मलाच म्हणशील तू.... " वेडू..."
....तेवढं बरं तुला कळतं
वेडे, .....तुझीच आठवण येते.......
मन, अलगद ओघळू लागतं

कूणीतरी लागते आपल्याला वेडू
म्हणणारेआणि वेडू म्हणतांना
आपल्यातील शहाणपण जपणारे

Friday, April 24, 2009

"अनपेक्षित भेट"

आज पुन्हा तुझी-माझी भेट झाली...
माझ्या डायरीची पानं नवी-कोरी झाली....
समोर आलीस सारं पुन्हा आठवले...
मिटलेले मनाचे दरवाजे अलगद उघडले...

पहिल्यांदाही अशीच नकळत भेट झाली
निम्मित पावसाचे अन भेटीची वेळ वाढली....
अनेकदा भेटलो त्यानंतरही आपण...
मैत्रीने तुझ्या केले मनात घर॥

वेडी वेडी व्हायचीस बोलतांना माझाशी
खुप सारी मस्ती,थट्टाही जराशी॥
तुझं सोबत असणं गॄहीतच धरलं मी...
मैत्रीशिवाय तुझ्या,आयुष्याचा विचारच नाही कधी...

पण कधीच नाही जाणल्या मी भावना तुझ्या...
मी तर रमलो होतो विश्वात माझ्या...
अचानक गेलीस निघुन ,बोलली नाहीस काही,
पण सोबत नसणे तुझे सांगुन गेले बरच काही,

काळ चालत रहिला,अशीच वर्ष उलटली...
स्मॄतीनीं तुझ्या नेहमीच माझी साथ दिली...
हरलो नाही मी,वाट पाहत राहीलो तुझी,
येशील तु परतुन खात्री होती माझी,

आज पुन्हा भेटलो अगदी तसेच अनपेक्षित...
नजरेला नजरा भिडल्या,अन मनं झाली आनंदित...
आज तुझ्या नजरेतले भाव मात्र मी अचुकपणे हेरले॥
नकळत माझ्याही त्यात होकाराचे सुर मिसळले.....!!!!!!

Wednesday, April 8, 2009

Life...

Escape...


You can run, you can hide
But you can't escape my love

Here's how it goes, you and me, up and down at this time
We'll get right, where to fight
Cause love is something you can't shake
When it breaks
All it takes is some trying

If you feel like leaving
I'm not gonna make you stay
Soon you'll be finding
You can run, you can hide
But you can't escape my love
You can run, you can hide
But you can't escape my love

So if you go
You should know
It's hard to just forget the past to pass
It was good, it was bad but it was real
And that's all you get in the end of the matter

Here's how it goes
All it takes is some trying
You can run, you can hide
But you can't escape my love ...

Thursday, March 26, 2009

Dreams On Fire...

Dreams On Fire...

You Are My Waking Dream, You' re All Thats Real To Me
You Are The Magic In The World I See
You Are In The Prayer I Saying, You Are In My Two My Names
You Are The Faith That Make Me Belive
Dreams On Fire, Higher N Higher
Pasion Burning, Ride On The Path, Once For Forever Yours
In Me, All Your Heart, Dreams On Fire, Higher N Higher

You Are My Ocean Rage, You Are My Thought Each Day
You Are The Laughter From Childhood Games
You Are Things Further Down, You Are Where I Belong
You Are Make Me Feel In Every Songs
Dreams On Fire, Higher N Higher, Pasion Burning
Ride On The Path, Once For Forever Yours, In Me
All Your Heart, Dreams On Fire, Higher N Higher....

Thursday, March 12, 2009

"मैत्रीमधले अश्रू"

असते मतलबी, दुनिया ही सारी,
पण आपले, निराळे, असतातही काही,
दैव ज्यांची, सतत परिक्षा पाही,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

जिथे असते श्रद्धा आणि भक्ति,
असे पुजनिय, असतात काही व्यक्ति,
क्षणिक असते, अबोल्याची सक्ति,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

गौण ठरतात मैत्रीपुढे, रक्ताची नाती,
कारन ही असते, सुंदर, निर्मळ नाती,
मनास होत नाही, कधी येथे क्षिती,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

इथे शब्द असतात काही, जे लागतात जिव्हारी,
विसर पडतो यांचा, इथे माणसं आपलीच सारी,
आठवणींन्ने त्यांच्या, मनास येते नवी ऊभारी,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी...

कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे...

कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे
दु:खाला विसरून सुखाला आणणार आहे
आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे

मनापासून प्रेम फ़क्त मीच करत होतो
तुला जगता यावे यासाठी फ़क्त मीच मरत होतो
माझ्या प्रेमाची कदर तुला कधीच कळली नाहि
कारण तुझ्या हृदयाची जागा कधीच खाली झाली नाहि
पण मी आनंदी राहू शकतो हेच तुला दिसणार आहे
कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे

तुला मी नको फ़क्त पैसा नी आराम हवा होता
तुला मी हेही दिले असते मला फ़क्त जरासा वेळ हवा होता
तुला हे सर्व मिळाले असेल पण मी नाहि मिळणार
कारण प्रेम म्हणजे काय तुला कधीच नाही कळणार
मी किती मजेत आहे हे सर्व जग बघणार आहे
कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे, नक्की जगणार आहे

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये...

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्रुदय कधी
जोडताना असह्य वेदना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकीही येऊ नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बन्द व्हावे

स्वप्नात कुणाला असेहि बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहिच नसावे

कुणाला इतकाही वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपनास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदि आपण त्याची वाट बघावी
आणि त्याची वात बघता बघता
आपलीच वाट दीशाहीन व्हावी

कुणाचे इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठांतुनही मग
त्याच्याच शब्दांचा ऊच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अश्रु जमावेत

आयुष्य जगतांना...

आयुष्य जगतांना असाही वागावं लागतं...
मन कडू आसतान्ना गोड़ बोलावं लागतं..
जगण्याचे सारेच प्रयत्न फोल ठरत जातात..
खपल्या काढल्या की जखमां कश्या खोल-खोल जातात..

माणसं जी आपली वाटतात..
ती आपली नसतातच मुळी..
तरीही एकमेकांत गुंतत जातात..
मनं आपली खुळी...

त्या दिवशी तर माझाच मरण
मलाच कसं टालुन गेलं..
चार घटका जीवाशी खेलून
तेहि मला सोडून गेलं....

जीव जात असला
तरी हसावे लागते
आयुष्य जगताना
असे वागावेच लागते...

Saturday, March 7, 2009

Sandip Khare...Collections of Poems...


मेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,
ज़ाहले इतुकेच होते कि तुला मी पाहिले

गोरट्या गालावरी का चोरटा हा रक्तिमा,
तू मला चोरून बघताना तुला मी पाहिले

एवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फ़ुला,
रंग देखील पाकळ्यांवर भार वाटू लागले

लाख नक्षत्रे उराशी नभ तरीही हळहळे,
हे तुझे नक्षत्र वैभव का धरे वर राहिले ?

पाहता तुज रंग उडुनी होई गजरा पांढरा
शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले
भर पहाटे मी फ़ुलांनी दृष्ट काढून टाकली,
पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले

मेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,

ज़ाहले इतुकेच होते कि तुला मी पाहिले

- संदिप खरे

---------------------------------------------------------

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविण ह्रुदय अडावे
मी तसाच अकंतिक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !


गीत - संदीप खरे

------------------------------------------------------------

करु वाटे खरे तर तुला एक फोन
यावा वाटे खरे तर तुझा एक फोन
असे काही होत नाही मग उगाचच
याला कर फोन कधी त्याला कर फोन

फोन तुझा सदा चालू कधी बंद नाही
आणि त्याला तारेचाही आता बंध नाही
पक्षापरी निरोपांची हवेतून ये-जा
हातातून तो ही परी झेपावत नाही
हातामध्ये फोन तरी प्रश्ण एवढाच
बोलायचे काय आणि बोलणार कोण

कसा बघ फोन माझा गावोगाव फ़िरे
हातातल्या हातामध्ये एकटाच झुरे
ह्रदयात साठवल्या काही जुन्या खुणा
टाकवेना फोन बाई जरी झाला जुना
पुन्हा पुन्हा करतो मी बटणाशी चाळा
पुन्हा पुन्हा बदलतो रींगरचा टोन !

खिडकीत साधुनिया सिग्नलचा कोन
कसे कसे किती किती बोलायचा फोन!
आता कसा उगामुगा वरवर बोले
जिभेवर जसे काही त्याच्या वारे गेले !
गोड गोड बोलायला एकटा मी पुरे
भाडायला तरी सखे लागतात ना दोन !

--------------------------------------------------------------

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...
त्याच जागी त्या येऊन जाशी, माझ्यासाठी... माझ्यानंतर...
कितीक् हळवे, कितीक् सुंदर...

अवचीत कधी सामोरे यावे...
अन् श्वासांनी थांबून जावे...
परस्परांना त्रास तरीहि, परस्पराविण ना गत्यंतर...

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...

मला पाहुनी... दडते-लपते,
आणिक तरीहि... इतूके जपते...
वाटेवरच्या फुलास माझ्या... लावून जाते हळूच फत्तर

भेट जरी ना ह्या जन्मातुन,
ओळख झाली इतकी आतून...
प्रश्न मला जो पडला नाही... त्याचेही तुझ सुचते उत्तर

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...

मला सापडे तुझे तुझेपण,
तुझ्या बरोबर माझे मीपण...
तुला तोलुनी धरतो मि अन्, तु ही मजला सावर् सावर...

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...

मेघ कधी हे भरुन येता,
आबोल आतून घुसमट होता...
झरते तिकडे पाणि टप् टप्... अन् इकडेही शाई झर् झर्...

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...
त्याच जागी त्या येऊन जाशी... माझ्यासाठी... माझ्यानंतर...
किती शहाणे आपूले अंतर...

- संदिप खरे

------------------------------------------------------------------

जुबा तो डरती है कहने से
पर दिल जालीम कहता है
उसके दिल में मेरी जगह पर
और ही कोई रहता है ॥ धृ ॥

बात तो करता है वोह अब भी
बात कहाँ पर बनती है
आदत से मैं सुनती हूँ
वोह आदत से जो कहता है ॥ १ ॥

दिलमें उसके अनजाने
क्या कुछ चलता रहता है
बात बधाई की होती है
और वोह आखें भरता है ॥ २ ॥

रात को वोह छुपकेसे उठकर
छतपर तारे गिनता है
देख के मेरी इक टुटासा
सपना सोया रहता है ॥ ३ ॥

दिलका क्या है,
भर जाये या उठ जाये,
एक ही बात...
जाने या अनजाने
शिशा टूटता है तो टूटता है ॥ ४ ॥

* संदीप खरे *

-----------------------------------------------------

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो.

मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी,
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो,
तो लंघुन चौकट पार निघाया बघतो.

डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप,
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप,
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,
घड्वून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो.

मी पायीरुतल्या काचांवरती चिडतो,
तो त्याच घे‌ऊनी नक्षी मांडून बसतो,
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती,
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनने हरतो.

मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली,
नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या
अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार,
लपतो न परि चेहरा आत भेसूर,
तो फक्‍त ओढतो शाल नभाची तरीही,
त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो

---------------------------------------------------

आताशा.. असे हे.. मला काय होते!!!

कुण्या काळचे , पाणी डोळ्यात येते.....
बरा बोलता बोलता , स्तब्ध होतो...
कशी शांतता , शून्य शब्दांत येते.......
आताशा.. असे हे .. मला काय होते!!!
कुण्या काळ चे , पाणी डोळ्यात येते!!!

कधी दाटु येता , पसारा घनांचा....
कसा सावला रंग , होतो मनाचा...
असे हालते .. आत हलुवार काही...
जसा सप्र्श पाण्यावरी चाँदण्याचा....

असा ऐकू येतो , क्षणाचा इशारा ...
क्षणी व्यरथ होतो ... दीशांचा पसारा...
नभातुन ज्या .. रोज जातो बुडूनी..
नभाशीच त्या... मागु जातो कीनारा....

न अंदाज कुठले.. न अवधान काही....
कुठे जायचे , यायचे भान नाही..
जसा गंध नीघतो, हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे.. न अनुमान काही....

कशी ही अवस्था.. कुणाला कलावे..
कुणाला पुसावे.. कुणी उत्तरावे...
कीती खोल जातो, तरी तोल जातो...
असा तोल जाता.. कुणी सावरावे....

आताशा .. असे हे ..मला काय होते ....
कुण्या काळ चे ,पाणी डोळ्यात येते....
बर बोलता बोलता , स्तब्ध होतो.
कशी शांतता शून्य शब्दांत येते...

आताशा असे हे मला काय होते ....
कुण्या काळ चे पाणी डोळ्यात येते.....

---------------------------------------------------------

उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार..
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे..
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये गर्दी फार..
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव..
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ..
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ७ ॥

------------------------------------------------------------

दिवानों की बाते है
इनको लबपर लाये कौन ?
इतना गेहेरा जाये कौन ?
खुदको यु उलझाये कौन ?

जो तु समझा अपना था
वो लमहों का सपना था
हमने दिल को समझाया
अब हमको समझाये कौन ?

तेरी गली मे हो आये
होश वही खो जाये
दिख जाये अगर तू पलभर
मैखाने मे जाये कौन ?

गली गली मे फ़िरते है
कई ठोकरें खाते है
जब तुनेही ठुकराया हमे
अब हमको अपनाये कौन ?

दिवानो की बाते है

Sandip Khare...One Of my Favorate Poet...


हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...(१)

कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते ...(२)

नदी नि शेतं नि वार्‍याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र" ...(३)

टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून...(४)

वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू ...(५)

बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय...(६)

माणूस आहेस "गलत" पण लिहितोस "सही"
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे.... काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही...(७)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ...(८)

ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात...(९)

उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो "नको... आता नाही"
फार नाही... चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन...(१०)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन....

....संदिप
-------------------------------------------------------------------
हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
हसलो म्हणजे दुखीः नव्हतो ऐसे नाही

हसलो म्हणजे फ़क्त स्वतःच्या फ़जितीवर
निर्लज्यागत दिधली होती स्वतःच टाळी
हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही
डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही

हसतो कारण तुच कधी होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्‍याला काही शोभत नाही
हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड
तितके काही गाल पसरणे अवघड नाही

हसतो कारण दुसर्‍यानांही बरे वाटते
हसतो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते
हसलो म्हणजे फ़क्त डकवली फ़ुले कागदी
आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही

हसतो कारण जरी बत्तीशी कुरुप आहे
खाण्याची अन दाखवण्याची एकच आहे
हसतो कारण सत्याची मज भिती नाही
हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही.... 

-------------------------------------------------------------
बॉस .....
बॉस खुप उशिरापर्यंत थांबायचा आणि वैताग आणायचा...
लाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत रहायचा...
आम्ही घरी निघालो की चुकचुकायचा...

मी लग्नाळलेला... वाटायचं- 'चांगलं घरी जायचं सोडून
कसलं हे उकरून उकरून काम करत रहाणं !'...

यथावकाश माझं लग्न झालं...
नव्या नवलाईचे पक्षी घरटं सोडेना झाले...
बघता बघता 'अतिपरिचित' झाले....

आणि हळूहळू पंख सैलावत जाताना
घरटयाची हाक आत तेवढीशी तीव्र उरली नाही...

आता बॉसला 'थांब' सांगावं लागत नाही...
केबिनमध्ये तो आणि केबिनबाहेर मी
एकमेकांना सोबत करत बसलेलो असतो...
कंटाळ्यातील भागीदारांच्या समजुतदारपणाने
घरी न जाता काम करत रहाण्याची 'अनिवार्यता'
दोघांनाही आता घट्ट धरून ठेवते...

उकरून उकरून काम करत प्रश्नांशी भांडत बसण्यापेक्षा
उकरून उकरून काम करणे सोपे असते,
हे निर्जन ऑफिसमधल्या सुन्न रात्रींशी
गुपचुप कबुल केलेए आहे मी...

- संदिप खरे

------------------------------------------------------------------
हृदय फेकले तुझ्या दिशेने
झेलाया तू गेलीस पटकन्‌
गफलत झाली परि क्षणांची
पडता खाली फुटले खळ्‌कन्‌

हृदय फेकले तूही जेंव्हा
सुटले तेही,पडलेही पण
तुटले नाही-फुटले नाही
नाद निघाला केवळ खण्‌कन्‌

गोष्ट येवढी इथेच थांबे
अशा गोष्टींना नसतो नंतर
खळ्‌कन्‌ आणि खण्‌कन्‌ यांतील
कधी कुठे का मिटले अंतर

मन पोलादी नकोच तुजसम
असो असूदे काच जरीही
फुटून जाते क्षणी परंतु
गंजायाची भीती नाही

--- संदीप खरे.

--------------------------------------------------------------------
आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ धृ ॥

किती काळ रहायचे; मान-अपमानी दंग,
पहा लकाके नभात; कसा शेवटला रंग.
कोण जाणे कोण्या क्षणी; सारे सोडून जायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ १ ॥

जरी भांडलो-तंडलो; तरी तुझीया सोबती,
दिली दुर्दैवाला पाठ; अन्‌ संकटाला छाती.
सारे कठीण; तुझीया सवे मृदूल व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ २ ॥

काही उणे माझ्यातले; काही दुणे तुझ्यातले,
बघ शेवटास सारे; कसे सुखमय झाले.
जन्मी पुढल्याही होऊ; अजूनही ओळखीचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ३ ॥

कष्ट, ध्यास, त्रागा, प्रेम, जिद्द, तडजोड, भीती,
जे जे झरले ते पाणी; आणि उरले ते मोती.
येत्या उद्याने जपावा; असा शिंपला व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ४ ॥

--- संदीप खरे.

-------------------------------------------------------
आठवतं तुला ?

आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होतं .
भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होतं .

आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होता .
ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होता .

आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होतो .
तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो .

आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती .
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.

आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं ?
मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं .

- संदिप खरे

------------------------------------------------------------
अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥

आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पुर
आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्मेचे नूर
अजुन तरी परवाना हा शम्मेपासुन दुर
मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥१॥

कुणी नजरेचा ताणुन बाण केलेली जखमी
कुणी ओठांची नाजुन अस्त्रे वापरली हुकमी
अन शब्दांचे जाम भरुन पाजियेले कोणी
मयखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥२॥

कधी गोडीने गाउ गेलो जोडीने गाणी
रमलो हे जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावानी
सर्वस्वाचे घेउनी दाने आले जरी कुणी
अजुन तरी सुटला नाही हातावरचा ताबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥३॥

कोण जाणे कोण मजला रोखुन हे धरते
वाटा देती हाका तरिही पाउल अडखळते
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
मोहाहुन ही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥४॥

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ...

---------------------------------------------------------------

हे गंधित वारे फिरणारे
घन झरझर उत्कट झरणारे . . .
हे परिचित सारे पूर्वीचे . . .
तरी आता त्याही पलिकडचे . . .
बघ मनात काही गजबजते . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

कुठल्या देशी नकळत माझे पाऊल पडले रे
सूर रोजचे कसे नव्याने मनास भिडले रे
हे गीत जयाला पंखसुध्दा . . .
अन हवाहवासा डंखसुध्दा . . .
कधि शंकित अन नि:शंकसुध्दा . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

मनात जे जे दडून होते नकळत आकळते
कसे दुज्याच्या स्पर्शाने 'मीपण' झगमगते
ही जाणीव अवघी जरतारी . . .
हर श्वासातुन परिमळणारी . . .
हर गात्रातुन तगमगणारी . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

नाव न उरले, गाव न उरले, अवघे ओसरले
बेभानाचे भान जिण्याला बिलगुन बसलेले
हा स्पर्श विजेच्या तारांचा . . .
हा उत्सव बघ अस्वस्थाचा . . .
हा जीव न उरला मोलाचा . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

-संदिप खरे

-------------------------------------------------------------
 दुपार . . .

अशी दुपारली वेळ, नभी भरलेल्या सरी
जीव घेत घेत माझा कोण उभे माझ्या दारी
किती जपून ठेवले गुज ओठावर आले
साऱ्य़ा सयीचे वऱ्हाड मेघा का रे बोलवले ?

दूर वाजते सनई तिला आभाळ पुरेना
मनातली हुरहुर जशी मनात मावेना
माझ्या मनात मांडव असा सहजी पडेना
आर्त मनाचे मनाचे जगभर सांगवेना

आता तरी दे ना दे ना मनातले आवताण
मनातल्या माणसाला येवो माझ्या देहभान
आता येथोनीच थांब नको मनभर होऊ
माझ्या कोशात मी बरा तिथे हाक नको देऊ

हाकेतुन तरी काय ? स्वर पाण्याचा पाण्याचा
तुझे आकाश पाण्याचे . . माझा डोळाही पाण्याचा
इथे पाणी तिथे पाणी . . एवढेच ना करणे
उन्हे पडल्यावरती पुन्हा भाजुन निघणे . . .

आता अंथरून वेळ पुन्हा पाय पसरीन
आणि कोसळता सरी आत आत पाझरीन. . .

- संदिप खरे
------------------------------------------------------------------
जरा चुकीचे... जरा बरोबर......
जरा चुकीचे, जरा बरोबर , बोलू काही.....
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही......

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू ..
उगाच वळसेे शब्दांचे हे देत रहा तू ....
भीडले नाहीत डोळे तोवर , बोलू काही......
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........

तूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ..
तूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ....
पाठ फीरू दे त्याची, नंतर बोलू काही........
चला दोस्त हो ;आयुष्या वर बोलू काही..........

हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ..
हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ....
नको-नको से हळवे कातर, बोलू काही.......
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........

"उदया-उदया" ची कीती काळजी , बघ रांगेतुन..
"उदया-उदया "ची कीती काळजी , बघ रांगेतुन....
"परवा" आहे "उदया"च नंतर, बोलू काही........
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........

श्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी..
श्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी....
वाट आंधळी, प्र्वास खडतर ,बोलू काही .......
चला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही..........

चला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही..........

* संदीप खरे 

Wednesday, February 11, 2009

Total Pageviews