Powered By Blogger

Saturday, March 7, 2009

Sandip Khare...Collections of Poems...


मेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,
ज़ाहले इतुकेच होते कि तुला मी पाहिले

गोरट्या गालावरी का चोरटा हा रक्तिमा,
तू मला चोरून बघताना तुला मी पाहिले

एवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फ़ुला,
रंग देखील पाकळ्यांवर भार वाटू लागले

लाख नक्षत्रे उराशी नभ तरीही हळहळे,
हे तुझे नक्षत्र वैभव का धरे वर राहिले ?

पाहता तुज रंग उडुनी होई गजरा पांढरा
शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले
भर पहाटे मी फ़ुलांनी दृष्ट काढून टाकली,
पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले

मेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,

ज़ाहले इतुकेच होते कि तुला मी पाहिले

- संदिप खरे

---------------------------------------------------------

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविण ह्रुदय अडावे
मी तसाच अकंतिक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !


गीत - संदीप खरे

------------------------------------------------------------

करु वाटे खरे तर तुला एक फोन
यावा वाटे खरे तर तुझा एक फोन
असे काही होत नाही मग उगाचच
याला कर फोन कधी त्याला कर फोन

फोन तुझा सदा चालू कधी बंद नाही
आणि त्याला तारेचाही आता बंध नाही
पक्षापरी निरोपांची हवेतून ये-जा
हातातून तो ही परी झेपावत नाही
हातामध्ये फोन तरी प्रश्ण एवढाच
बोलायचे काय आणि बोलणार कोण

कसा बघ फोन माझा गावोगाव फ़िरे
हातातल्या हातामध्ये एकटाच झुरे
ह्रदयात साठवल्या काही जुन्या खुणा
टाकवेना फोन बाई जरी झाला जुना
पुन्हा पुन्हा करतो मी बटणाशी चाळा
पुन्हा पुन्हा बदलतो रींगरचा टोन !

खिडकीत साधुनिया सिग्नलचा कोन
कसे कसे किती किती बोलायचा फोन!
आता कसा उगामुगा वरवर बोले
जिभेवर जसे काही त्याच्या वारे गेले !
गोड गोड बोलायला एकटा मी पुरे
भाडायला तरी सखे लागतात ना दोन !

--------------------------------------------------------------

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...
त्याच जागी त्या येऊन जाशी, माझ्यासाठी... माझ्यानंतर...
कितीक् हळवे, कितीक् सुंदर...

अवचीत कधी सामोरे यावे...
अन् श्वासांनी थांबून जावे...
परस्परांना त्रास तरीहि, परस्पराविण ना गत्यंतर...

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...

मला पाहुनी... दडते-लपते,
आणिक तरीहि... इतूके जपते...
वाटेवरच्या फुलास माझ्या... लावून जाते हळूच फत्तर

भेट जरी ना ह्या जन्मातुन,
ओळख झाली इतकी आतून...
प्रश्न मला जो पडला नाही... त्याचेही तुझ सुचते उत्तर

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...

मला सापडे तुझे तुझेपण,
तुझ्या बरोबर माझे मीपण...
तुला तोलुनी धरतो मि अन्, तु ही मजला सावर् सावर...

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...

मेघ कधी हे भरुन येता,
आबोल आतून घुसमट होता...
झरते तिकडे पाणि टप् टप्... अन् इकडेही शाई झर् झर्...

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...
त्याच जागी त्या येऊन जाशी... माझ्यासाठी... माझ्यानंतर...
किती शहाणे आपूले अंतर...

- संदिप खरे

------------------------------------------------------------------

जुबा तो डरती है कहने से
पर दिल जालीम कहता है
उसके दिल में मेरी जगह पर
और ही कोई रहता है ॥ धृ ॥

बात तो करता है वोह अब भी
बात कहाँ पर बनती है
आदत से मैं सुनती हूँ
वोह आदत से जो कहता है ॥ १ ॥

दिलमें उसके अनजाने
क्या कुछ चलता रहता है
बात बधाई की होती है
और वोह आखें भरता है ॥ २ ॥

रात को वोह छुपकेसे उठकर
छतपर तारे गिनता है
देख के मेरी इक टुटासा
सपना सोया रहता है ॥ ३ ॥

दिलका क्या है,
भर जाये या उठ जाये,
एक ही बात...
जाने या अनजाने
शिशा टूटता है तो टूटता है ॥ ४ ॥

* संदीप खरे *

-----------------------------------------------------

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो.

मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी,
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो,
तो लंघुन चौकट पार निघाया बघतो.

डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप,
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप,
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,
घड्वून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो.

मी पायीरुतल्या काचांवरती चिडतो,
तो त्याच घे‌ऊनी नक्षी मांडून बसतो,
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती,
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनने हरतो.

मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली,
नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या
अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार,
लपतो न परि चेहरा आत भेसूर,
तो फक्‍त ओढतो शाल नभाची तरीही,
त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो

---------------------------------------------------

आताशा.. असे हे.. मला काय होते!!!

कुण्या काळचे , पाणी डोळ्यात येते.....
बरा बोलता बोलता , स्तब्ध होतो...
कशी शांतता , शून्य शब्दांत येते.......
आताशा.. असे हे .. मला काय होते!!!
कुण्या काळ चे , पाणी डोळ्यात येते!!!

कधी दाटु येता , पसारा घनांचा....
कसा सावला रंग , होतो मनाचा...
असे हालते .. आत हलुवार काही...
जसा सप्र्श पाण्यावरी चाँदण्याचा....

असा ऐकू येतो , क्षणाचा इशारा ...
क्षणी व्यरथ होतो ... दीशांचा पसारा...
नभातुन ज्या .. रोज जातो बुडूनी..
नभाशीच त्या... मागु जातो कीनारा....

न अंदाज कुठले.. न अवधान काही....
कुठे जायचे , यायचे भान नाही..
जसा गंध नीघतो, हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे.. न अनुमान काही....

कशी ही अवस्था.. कुणाला कलावे..
कुणाला पुसावे.. कुणी उत्तरावे...
कीती खोल जातो, तरी तोल जातो...
असा तोल जाता.. कुणी सावरावे....

आताशा .. असे हे ..मला काय होते ....
कुण्या काळ चे ,पाणी डोळ्यात येते....
बर बोलता बोलता , स्तब्ध होतो.
कशी शांतता शून्य शब्दांत येते...

आताशा असे हे मला काय होते ....
कुण्या काळ चे पाणी डोळ्यात येते.....

---------------------------------------------------------

उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार..
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे..
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये गर्दी फार..
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव..
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ..
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ७ ॥

------------------------------------------------------------

दिवानों की बाते है
इनको लबपर लाये कौन ?
इतना गेहेरा जाये कौन ?
खुदको यु उलझाये कौन ?

जो तु समझा अपना था
वो लमहों का सपना था
हमने दिल को समझाया
अब हमको समझाये कौन ?

तेरी गली मे हो आये
होश वही खो जाये
दिख जाये अगर तू पलभर
मैखाने मे जाये कौन ?

गली गली मे फ़िरते है
कई ठोकरें खाते है
जब तुनेही ठुकराया हमे
अब हमको अपनाये कौन ?

दिवानो की बाते है

No comments:

Total Pageviews