Powered By Blogger

Tuesday, May 26, 2009

मी.........


खंरतर स्वताबद्दल काय लिहायचे असा प्रश्न सर्वानांच पडतो कदाचित! 
कारण मला तो पडला होता. 
Internet च्या अभासी दुनियेत म्हणजे येथे मि काहीही लिहले ते खरे का खोटे हे त्या समोरच्या व्यक्तीच्या विश्वासावरचं अवलंबुन असेल...........
समोर बसलेली व्यक्ती खरी का खोटी हे जस तुम्हाला त्याच्याशी मैत्री केल्याशिवाय समझणार नाही. 
तसं ते मलाही सांगता येणार नाही.

प्रत्येकाचे स्वभाव, आवडी-निवडी, जरी वेगळे असले तरी मैत्री होण्याचे बरेच Chance आहेत. 
एकाद्याचे मन जिंकल्याशिवाय जशी निखळ मैत्री होत नाही तशी तेच मन दुखवल्यावर ति मैत्री टिकतही नाही.

तरीही मला तुमच्याशी मॆत्रि करण्यात Intrest आहे. 
कारण आयुष्याचा प्रवास तुम्हा-आम्हाला एकदाच करायचा आहे..........
एकचं संधी आयुष्य जगण्याची, मित्र होण्याची..........
आयुष्याच्या प्रवासात मैत्रीच्या ट्रेनमध्ये प्रवास करण्याची.............. 
करालं ना मग मैत्री?...


"असाच आहे मी
चांदण्यांबरोबर रात्री गप्पा मारणारा
वाऱ्याबरोबर दुर
फिरायला जाणारा
हिरव्या सावलीत
कोठेतरी रमलेला
असाच आहे मी
कवितेतल्या चारओळीत
कोठेतरी हरवलेला"


मी आहे हा असा आहे,पटले तर बघा नाहीतर सोडून द्या.

धन्यवाद!!!!!!!!!!!!!!!


माज़्या सारखा एखादाच असतो
नशीबवान तर सगळेच असतात
नशीबाला बदलणारा एखादाच असतो
हसतमुख तर सगळेच असतात
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो
मर्त्य तर सगळेच असतात
कर्तुत्ववान अमर एखादाच असतो
चमकणारे काजवे बरेच असतात
प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो
सुखाचे सोबती सर्वच असतात
दुःखाचा साथीदार एखादाच असतो
अनुभवाने शहाणे बरेच असतात
अनुभवालाही शाहाणा करणारा एखादाच असतो
जाळणारे बरेच असतात
मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो
प्रेम करणारे बरेच असतात
पणं माज़्या सारखा प्रेम करणारा एखादाच असतो.............




आयुष्याला "fullstop"लागायच्या आधी......
काहीतरी करून दाखवायचय,
लाखोंच्या गर्दीत स्वतःसाठी
"red carpet"बनवायचय !!
आरशासमोर उभं राहून
नजर वर करून 'त्याला' बघायचय,
ताठ मानेनेच 'त्या' समोरच्याला विचारायचय,
तू फ़क्त बोल,अजून कोणतं क्षितिज गाठायचय!!!
सरवांच्या मनात एक छोटंस
घर करून राहायचय,
माझ्या नुसत्या आठवणींतुनच
दुःखी मनांना हसवायचय,
एकदा का "fullstop" लागला की,
आठवणींतुनच मला पुन्हा जगायचय!!!!

No comments:

Total Pageviews